सरकारी आदेशानुसार पहिली ते नववीचे वर्ग सुरू; शाळेतही खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
अवघ्या आठवडाभरानंतर पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ‘लाँग लिव्ह’चा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळांमध्ये उत्साहात प्रवेश केला. मात्र, पाल्यांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांच्या चेहऱयावरील हुरहुर मात्र लपून राहिली नाही.
मागील सोमवारी (दि. 10) जिल्हाधिकाऱयांनी शाळा बंदचे आदेश बजावले होते. त्यामुळे पहिली ते नववीचे वर्ग बंद ठेवण्यात आले. पण तात्काळ आठवडाभरातच शाळा सुरू करण्याचे आदेश सरकारकडून बजावण्यात आले. त्यानुसार सोमवार दि. 17 पासून पुन्हा शाळा गजबजल्या. विद्यार्थी मोठय़ा उत्साहाने शाळेत दाखल होतानाचे चित्र सुखावह होते. दुसरीकडे पालक चिंता व्यक्त करताना दिसत होते. आमच्या मुलांना कोरोना झाला तर? असा प्रश्न त्यांच्या चेहऱयावर झळकत होता.
सोमवारी सकाळी शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये शाळा आवारात प्रवेश करणाऱया विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करून त्यांना सॅनिटायझर, मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबत शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जात होते.
रिक्षामामांची वर्दळ सुरू
गेल्या आठवडाभरापासून शहरातील रिक्षामामांच्या रिक्षांना बेक लागला होता. शाळा सुरू झाल्याने त्यांच्यातही उत्साह आहे. शाळेत सामाजिक अंतर पाळले जात असताना रिक्षात मात्र त्याचा बोजवारा उडत आहे. परंतु, पालकांचा नाईलाज असल्याच्या प्रतिक्रिया
क्यक्त होत आहेत.
पहिल्याच दिवशी 14 विद्यार्थी बाधित
शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरात 14 विद्यार्थी आणि 10 शिक्षक कोरोनाबाधित झाले
आहेत. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे चौकशी केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, शाळा बंद होणार नाहीत, असे ते म्हणाले.
शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांची काळजी
शाळा उत्साहात सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांत उत्साह असून शिक्षकदेखील विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. ज्या शाळेत 10 टक्क्मयाहून कमी प्रमाणात बाधित आढळतील, त्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. त्याहून अधिक बाधित आढळल्यास जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून निर्णय घेतला जाईल.
– बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी
ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद
ग्रामीण भागातील शाळांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील पालकांमध्ये कमी भीती आहे. तरीही संबंधित अधिकाऱयांच्या माध्यमातून सतर्कतेसाठी प्रयत्न करीत आहोत.
– ए. पी. जुट्टण्णावर, गटशिक्षणाधिकारी ग्रामीण
आम्ही दक्षता घेतोय, शाळेतही घ्यावी
दररोज विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे ऐकून भीती तर वाटणारच ना! लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणाची वाताहत झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नाईलाज आहे. आम्ही दक्षता घेतोय. पण शाळेतही ती घेतली जावी.
– आनंद बुद्रुक, पालक, अनगोळ