पदवी, आयटीआय विद्यार्थ्यांनाही काढावा लागणार नवीन बसपास
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनकडून मागील दोन महिन्यांपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत विविध इयत्तेतील 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. सुरुवातीच्या दिवसांत विद्यार्थ्यांनी बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता बसपास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे बसपासच्या मागणीसाठी देखील बसपास विभागात अर्ज दाखल होताना दिसत आहेत.
दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की, बसपास प्रक्रिया सुरू होते. मात्र गतवर्षांपासून शाळांना उशिराने प्रारंभ झाल्याने बसपास प्रक्रियेला देखील उशिराने प्रारंभ होत आहे. दरवषी 76 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून बसपास काढला जातो. मात्र कोरोनामुळे शैक्षणिक वर्षं विस्कळीत झाल्याने बसपास मिळवणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. पदवी आणि आयटीआय विद्यार्थ्यांना जुन्या बसपासची मुदत वाढवून देण्यात आली होती. ती मुदतही आता नोव्हेंबर अखेर संपणार आहे. त्यामुळे पदवी आणि आयटीआय विद्यार्थ्यांना नवीन बसपास काढावा लागणार आहे. गतवर्षांपासून बसपास प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागत आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट असल्याने विद्यार्थ्यांना देखील बसपास मिळविताना त्रास सहन करावा लागत आहे.