ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
देशात विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक 49 टक्के होती. आता विमा कायदा 1938 मध्ये बदल करण्यात आले असून, या क्षेत्रातील परकीय गुंतवणूक 74 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.