जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : एकमेकांपासून दूर राहिल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता कमी!
वार्ताहर / कणकवली:
कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती प्रत्येकजण जाणतोच आहे. जिल्हय़ाबाहेरून येणाऱया रहिवाशांना वेगळे ठेवण्यासाठी शाळांपेक्षा कोकणातील विशेषतः जिल्हय़ातील बंद असलेल्या घरांचा विचार व्हावा, अशी मागणी प्रदेश जनता दलातर्फे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हय़ातील जवळपास प्रत्येक गावात पाच-पन्नास घर मालक मुंबईत असल्याने ही घरे बंद असल्याचे आढळून येईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परंतु इच्छीणाऱयांमध्ये याच लोकांचा मोठा सहभाग असणार असल्याचे नारकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्गातील घरे तुलनेने ऐसपैस, पुन्हा एकमेकांपासून दूर आणि घराभोवती परसव असलेली असतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्मयता आपोआपच कमी होते. आज विशेषतः मुंबईतील झोपडपट्टय़ा, बैठी घरे यातून राहणाऱया प्रत्येक कोकणी माणसाला आपल्या गावाकडे परतावे, असे वाटतेय. त्यात अडचणी असल्या, तरी आज ना उद्या सरकारकडून मार्ग निघेल. त्यात एक गोष्ट नक्की असणार आहे, ती म्हणजे काही काळ वेगळं, गाववाल्यांच्या संपर्कात न येता राहणं. त्यातील पहिले 14 दिवस कदाचित सरकारी व्यवस्थेत राहवे लागू शकेल, त्यानंतर पुन्हा गावातही आणखी 14 दिवस वेगळं राहवं लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अशी वेगळी व्यवस्था करण्यासाठी गावांमधील शाळांचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते. मी देवगड तालुक्मयातील विठ्ठलादेवी येथील मूळचा रहिवासी आहे. आमच्या गावातील फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्येही संस्थेचा पदाधिकारी (प्रमुख कार्यवाह) या नात्याने आमचे आपल्याला सहकार्य असणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या घरांचा किमान मुंबईहून येणाऱया मूळ मालक आणि त्याच्या कुटुंबाला वेगळे राहण्यासाठी वापर करता येईल. बहुतेक घरे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाक घर यांनी सुसज्ज असल्याने राहणाऱयांची कोणतीच अडचण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाडीवार लक्ष ठेवण्यासाठी मंडळांचा वापर करा!
त्यांना लागणाऱया जीवनावश्यक वस्तू बाजारातून आणून देण्याचे काम शेजारी वा वाडीतील तरुण (जे या कुटुंबांचे बहुदा नातलगच असतील) करू शकतील. शिवाय या कुटुंबांकडून वेगळे राहण्याचा नियम मोडला जात नाही ना, यावर शेजारी वा वाडीतील लोकच लक्ष ठेवू शकतील. त्यामुळे साथीचा प्रसार रोखण्याचे कामही आपोआपच होईल. वाडीवार असलेल्या मंडळांचा यासाठी उपयोग होऊ शकेल. उलट शाळांमध्ये असे लक्ष ठेवणे तसेच आवश्यक व्यवस्था करणे अधिक अवघड होणार आहे. त्यामुळे बंद घरांची संख्या कमी पडली, तर शाळा वा अन्य शासकीय इमारतींचा विचार व्हावा, असे नारकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.