ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्रातील वातावरण तर चांगलेच ढवळून निघाले. शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन देखील केले.
यासर्व विरोधानंतर कंगनाला आता अखेर उपरती झाली असून तिने मुंबईने मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी आहे, असे ट्वीट केले आहे.
महाराष्ट्रासह माझ्या सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे आणि मला माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबाबत माझं प्रेम सिद्ध करायची गरज नाही, जिने मला यशोदा आईसारखं स्वीकारले आहे, जय मुंबई जय महाराष्ट्र, अशा आशयाची मुंबईबाबत ची आपली भावना कंगनाने ट्विट करुन व्यक्त केली आहे.
त्यासोबतच तिने एक फोटोही ट्वीट केला आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर #IndiaWithKanganaRanaut ट्रेंड करत आहे.