प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या विविध योजना राबवून जिल्हय़ाचा विकास साधला जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या योजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बेळगावात दाखल झाले आहे.
या योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये महात्मा गांधी नरेगा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संसद आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा समावेश आहे. रविवारी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय, वंटमुरी येथील रोजगार हमी योजनेतून खोदलेल्या तलावांना भेटी देऊन पाहणी केली. हे पथक मंगळवार दि. 22 पर्यंत विविध योजनांची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवणार आहे.
पंचायत राज्य खात्याचे बेळगाव जिल्हा सचिव एल. के. अतिक, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, ता. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश दानवाडकर यांच्यासह ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. सुखविंदर सिंग, डॉ. सातरला नागभूषणराव, मुसुकू राजशेखर रेड्डी, इसुकापल्ली रामचंद्र रेड्डी आदींचा पथकात समावेश आहे.
केंद्रीय पथक सोमवार दि. 21 रोजी तालुक्मयातील तारीहाळ, बेनकनहळळी, बस्तवाड यासह इतर ग्रामपंचायतींना भेट देणार आहे.