अधीक्षक अभियंत्यांशी कुडाळ येथे चर्चा : कुडाळ, मालवण तालुक्यातील समस्या मांडल्या
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ व मालवण तालुक्मयातील विविध वीज प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याशी चर्चा करीत दोन्ही तालुक्मयातील वीज प्रश्न तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या.
ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे. त्या सर्व कामांचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासन स्तरावर पाठवावा. त्यासाठी लागणारा सर्व निधी मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे नाईक यांनी सांगत महावितरण विभागाच्या अधिकाऱयांना आवश्यक सूचना दिल्या. मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही मालवण शहरातील विविध वीज समस्यांबाबत अधीक्षक अभियंता पाटील यांचे लक्ष वेधत त्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.
कुडाळ व मालवण तालुक्मयातील विविध वीज प्रश्नांबाबत नाईक यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासमवेत पाटील यांची कुडाळ येथील महावितरण कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, जि. प. माजी सदस्य संजय भोगटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, राजू गवंडे, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, सुयोग ढवण, मंजू फडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि वीज ग्राहक उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकारी, नगराध्यक्ष कांदळगावकर व नगरसेवकांनी विविध वीज समस्यांबाबत आमदार नाईक यांच्या उपस्थितीत पाटील यांचे लक्ष वेधले. यावर नाईक यांनी दोन्ही तालुक्मयातील वीज प्रश्न तातडीने दूर करावेत, अशा सूचना महावितरण विभागाला दिल्या. ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे. त्या सर्व कामांचा प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर पाठवावा. त्यासाठी लागणारा सर्व निधी मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे नाईक यांनी सांगितले.
राजन नाईक, संजय भोगटे यांनी कुडाळ तालुक्मयातील वीज प्रश्नांबाबत अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधले, तर कांदळगावकर, खोबरेकर व नगरसेवकांनी मालवण शहर व तालुक्मयातील विविध वीज प्रश्नांबाबत लक्ष वेधले. कांदळगावकर व खोत यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत निवेदन अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले. मालवण शहरात स्पेसर बसविण्याचे काम काही भागात अद्याप झालेले नाही. ते तातडीने पूर्ण करावे. शहरात काही भागात एरिया केबलचे काम करण्यात आले आहे. परंतु, यामधील वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती केली जात नाही. एरिया केबल उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. या एरिया केबलच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे. शहरातील धोकादायक खांब अद्याप बदलण्यात आलेले नाहीत. ते तातडीने बदलावेत. शहरात भुयारी वीज वाहिनीचे काम सुरू आहे. याबाबत मालवण न. पं. ने महावितरणकडे पैसे भरण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही व्हावी. शहरासह ग्रामीण भागात वीज वाहिन्यांना गार्डिंग व्यवस्था करण्यात यावी. पावसाळय़ात वीज वाहिन्यांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती तातडीने हटवावीत, या मागण्यांबाबत कांदळगावकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.