सांगली प्रतिनिधी
सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजता सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोर्चात इतर प्रमुख मागण्या करण्यात येणार आहे त्यामध्ये उर्वरीत एफ.आर.पी. तातडीने द्यावी. वजनातील काटामारी थांबवावी, तोडीसाठी घेतले जाणारी पैश्याची पध्दत बंद करावी. द्राक्षपिक विमा योजना सक्षम करावी. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी द्राक्षबागाना आवरण कागदासाठी अनुदान द्यावे. रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी. भूमी अधिग्रहण कायदा पुर्वीप्रमाणे लागू करावा. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान सत्वर द्यावे या मागण्या करण्यात येणार आहे.
या मोर्चात प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, महेश खराडे, पोपट मोरे, यांची असणार आहे.