प्रतिनिधी/ बेळगाव
वीज ग्राहकांना आता आणखी एक शॉक बसण्याची शक्मयता आहे. प्रति वर्षाप्रमाणे यावषीही 1 एप्रिल पासून राज्यात नवे वीज दर लागू करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. वीज वितरण करणाऱया कंपन्या दरवाढीचा प्रस्ताव करीत असून, लवकरच तो विद्युत नियामक मंडळाकडे (केईआरसी) कडे पाठविण्यात येणार आहे. विजेच्या दरातील तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करणे गरजेचे असल्याचे मत कंपन्यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक वषी 1 एप्रिलपासून राज्यभरात विजेचे नवीन दर लागू होतात. मागील वषी संपूर्ण जगभरात कोरोनाचा हाहाकार असल्यामुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. लॉकडाऊननंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर दरवाढीसाठीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. अखेर 1 नोव्हेंबर पासून राज्यात नवी दरवाढ करण्यात आली. सरासरी प्रति युनिटमागे 33 पैसे दरवाढ करण्यात आली होती. व्यवसाय सुरू नसतानाही नागरिकांनी वीजबिलाचे पैसे भरले होते.
ही दरवाढ होऊन अवघे दोन महिने होताच पुन्हा एकदा दरवाढीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मागीलवषी नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 हा अवघा 5 महिन्यांचा कालावधी मिळाल्याने वीज वितरण कंपन्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वीज निर्मितीचे दर दिवसागणिक वाढत असून, ही तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करणे गरजेचे असल्याचे मत वितरण कंपन्या व्यक्त करीत आहेत.
मोठी दरवाढ होण्याची शक्मयता
मागील वषी कोरोनामुळे प्रति युनिटमागे केवळ 33 पैसे दरवाढ मंजूर करण्यात आली होती. परंतु वीज निर्मिती करण्यासाठी येणारा खर्च व वीज विक्रीतून येणारे उत्पन्न यात तफावत वाढत आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी यावेळी मोठी दरवाढ होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा विजेचा शॉक बसणार आहे.