वार्ताहर / वेंगुर्ले:
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, वेंगुर्ले पंचायत समिती तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आयोजित कृषिदिन ???? अंतर्गत ‘कृषी संजीवनी सप्ताह’ कार्यक्रमाचा शुभारंभ वेंगुर्ल्यात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त जिल्हा परिषदचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांनी शेतकऱयांच्या बांधावर उतरुन श्री पद्धतीने व यांत्रिकीकरणाद्वारे भातशेती लागवड उपक्रमाची माहिती घेतली.
यावेळी जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, वेंगुर्ले सभापती अनुश्री कांबळी, जि.प. वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हेत्रे, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी येथील तालुका कृषी विभाग वेंगुर्ले यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रभाकर अनंत वारंग यांच्या शेतातील ‘श्री’ पद्धतीने भात लागवड उपक्रमाला भेट दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांना तालुका कृषी विभागाच्या कर्मचाऱयांच्यावतीने लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तर कृषी पर्यवेक्षक रामचंद्र केसरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे, मुकुंद मराठे, कृषी सहाय्यक अरविंद ठुंबरे, प्रसाद खडपकर यांच्यासह कृषी सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर सर्व मान्यवरांनी आडेली येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या यांत्रिकीकरण पद्धतीने करण्यांत येणाऱया भात लागवड उपक्रमाला भेट दिली. यावेळी मान्यवरांना याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.