सावंतवाडी / प्रतिनिधी:-
सावंतवाडी शहर हाताळण्यात नगराध्यक्ष संजू परब अपयशी ठरले आहेत ते सत्तेत आल्यापासून शहरात वेगळीच संस्कृती जन्मास येत आहे. वर्षभरापूर्वी आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी शहराचा विकास करू असे सांगितले होते. मात्र आता आमदार राणे आहेत कुठे? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
परिवहन मंत्री अनिल परब यांचा राजीनाम्याबाबतचे राणे यांनी वक्तव्य केले होते परंतु त्यांना नगराध्यक्ष संजू परब यांच्या राजीनाम्याबाबत बोलायचे होते चुकून ते मंत्री अनिल परब यांचा राजीनाम्याबद्दल बोलले अशी खोचक टीकाही शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी शहरप्रमुख शब्बीर मणियार, सुरेश भोगटे आदी उपस्थित होते.