पारा घसरला : नागरिक घेताहेत ऊबदार कपडय़ांचा आधार
प्रतिनिधी /बेळगाव
मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असून हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे शहराचा पारा घसरला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असून पारा 14 अंशांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात थंडीची अधिक तीव्रता
जाणवू लागल्याने रात्रीच्या वेळी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.
मागील आठवडय़ात थंडी काही प्रमाणात कमी होती. मात्र, आता पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांना ऊबदार कपडय़ांची गरज भासू लागली आहे. थंडीने स्वेटर आणि जॅकेट्स, कानटोप्या, हातमोजे, मफलर आदी ऊबदार कपडय़ांना पसंती दिली जात आहे. त्याबरोबर वाढत्या थंडीने आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. थंडी, ताप, खोकला, कफ आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.
थंडीबरोबर पहाटेच्या वेळी धुकेदेखील पडत आहे. त्यामुळे वाहनधारकांसमोर अडचणी निर्माण होत आहे. धुक्मयातून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे. मागील महिन्यात थंडीला सुरुवात झाली होती. मात्र, मध्यंतरी थंडी काहीशी ओसरली होती. मात्र, पुन्हा आता थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱयांना थंडीचा अधिक सामना करावा लागत आहे. यंदा ऑक्टोबर हिट जाणवली नाही. परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या प्रारंभी झाला. त्यानंतर थंडीची चाहूल सुरू झाली होती. मध्यंतरी कमी झालेली थंडी आता वाढू लागली आहे. त्यामुळे शहराचा पारादेखील खाली खाली येताना दिसत आहे.