दिवसभर ढगाळ वातावरण : पहाटे-रात्री कडाक्याची थंडी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या तीन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागामध्ये कडाक्मयाच्या थंडीने साऱयांनाच हुडहुडी भरली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री व पहाटे थंडी पडू लागली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनता उबदार कपडे परिधान करताना दिसत आहे. अचानकपणे थंडीत वाढ झाल्याने आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. शुक्रवारी कमाल 25.7 तर किमान 11.4 तापमानाची नोंद झाली आहे.
दरवषी ऑक्टोबर अखेरनंतर थंडीला सुरुवात होते. मात्र यावषी डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे थंडी गायब झाली होती. आता थंडी पडणार नाही, अशी शक्मयता वर्तविण्यात येत होती. मात्र जोरदार थंडीची लाट आली असून गेल्या तीन दिवसांपासून पारा घसरला आहे. या बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे कडधान्य पिकालाही फटका बसू लागला आहे. सध्या उगवण झालेली कडधान्य पिके खराब होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱयांमध्ये पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. यावषी उशिराने कडधान्य पेरणी शेतकऱयांनी केली आहे. आता त्याची उगवण होत आहे. मात्र या बदलत्या हवामानामुळे फटका बसू लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे मॉर्निंग वॉकर्सची संख्याही घटली आहे. दिवसभरच थंड वातावरण राहिल्यामुळे उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. थंडीमुळे उबदार कपडे विक्री करणाऱया व्यावसायिकांचा व्यवसाय मात्र जोमात चालला आहे.