कचराकुंडमुक्त शहराचा दावा फोल : रविवारपेठेत मनपाच्या जागेत नव्याने कचराकुंड : परिसरात दुर्गंधी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी कचऱयांचे ढिगारे साचत असून रविवारपेठेत मनपाच्या जागेत नव्याने कचराकुंड निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून व्यावसायिकांसह नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथील कचराकुंड व स्वच्छतागृह हटविण्याची मागणी होत आहे.
घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंडय़ा हटविण्यात आल्या आहेत. पण कचरा घेणारी वाहने आणि कामगार वेळेवर येत नसल्याने साचणारा कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत असून स्वच्छ बेळगाव, सुंदर शहरचा बोजवारा उडाला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आलेल्या रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. फुटपाथशेजारी टाकलेल्या कचऱयामुळे अस्वच्छता निर्माण होत असून दुर्गंधी पसरत आहे. परिसरातून ये-जा करणाऱया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. टिळकवाडी, गोवावेस तसेच विविध परिसरात रस्त्याशेजारी कचरा साचत असल्याने महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम अपयशी ठरल्याची टीका नागरिक करीत आहेत.
रविवारपेठ परिसरात महापालिकेचे बिट कार्यालय होते. पण सदर इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आली आहे. मात्र सध्या सदर इमारत कचराकुंड बनली असून परिसरातील नागरिक व व्यावसायिक या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला जातो. पण प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी येथे दुर्गंधी पसरली असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. तसेच या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याकडे मनपाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.