नवी दिल्ली
पीएलआय स्कीमचा फायदा उठवण्यासाठी शाओमी ही चिनी कंपनी पुढे आली असून येणाऱया काळात भारतात टीव्हीचे उत्पादन वाढवण्याचा विचार कंपनीने केला असल्याचे समजते. भारतात 3 नव्या प्लांटच्या माध्यमातून टीव्हींचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यायोगे स्मार्टफोन्सच्या निर्मितीलाही बळ दिले जाणार आहे. स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी तीन नव्या कारखान्यात उत्पादन प्रक्रियेला वेग दिला जात आहे. स्मार्टफोन्सचा पुरवठा शाओमीने 20 टक्के इतका भारतात अलीकडे वाढवला आहे. टीव्हींनाही मागणी असल्याने यांचे उत्पादन वाढवले जात आहे.