जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू : महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
अल्पवयीन मुली शाळांमध्येच प्रेमात पडत आहेत. त्यानंतर लग्न करणे, पळून जाणे असे प्रकार घडत आहेत. या लग्नाला घरच्यांचा विरोध असतो. त्यामुळे मुलगा आणि मुलगी एकाकी पडतात. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. असे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढत चालले आहेत. त्यामुळे आता आम्ही मुला-मुलींना प्रथम शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभे रहा, त्यानंतर तुमचा जोडीदार तुम्ही निवडा, अशा प्रकारची जनजागृती करत असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवरील होणाऱया अन्यायाबाबत महिला आयोगाने नेहमीच गांभीर्याने घेतले आहे. कौटुंबिक वादातून महिलांवर अन्याय, अत्याचार वाढत आहेत. अशी एकूण 1 हजार 89 प्रकरणे एका वर्षांमध्ये दाखल झाली आहेत. त्यामधील 899 प्रकरणांचा निकाल तातडीने देण्यात आला आहे. काही प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
वर्षाला 2 हजारच्या आसपास प्रकरणे दाखल होतात. त्यामधील 5 टक्के प्रकरणे ही बोगस असतात. त्याबाबत संपूर्ण विचारविनिमय करूनच निर्णय घेतला जातो. बरीच प्रकरणे न्यायालयामध्ये प्रलंबित असतात. त्यामुळे आम्हालादेखील त्यामध्ये हस्तक्षेप करणे कठीण जाते. तरीदेखील महिलांना आम्ही नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रमिला नायडू यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हय़ामध्ये महिला सांत्वन केंद्रामध्येच पुरुषांना ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत मराठी वृत्तपत्रांतून जोरदार आवाज उठविण्यात आला होता. मराठीबरोबर इतर भाषिक दैनिकांनीही त्यानंतर त्याची दखल घेतली होती, अशी माहिती प्रमिला नायडू यांना पत्रकारांनी दिली. त्याबाबत मला काही माहिती नाही. मात्र निश्चितच आम्ही या प्रकरणाची चौकशी करून संबंधित एनजीओवर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महिला आयोग नेहमीच वरि÷ पोलीस अधिकारी तसेच अधिकाऱयांच्या संपर्कात असतो. बऱयाचवेळा महिलांना वेळेत न्याय मिळत नाही. पोलीस स्थानकामध्यही नाहक त्रास सहन करावा लागत असतो, अशा तक्रारी येतात. मात्र त्यानंतर तातडीने आम्ही वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधून संबंधित महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतो, असे त्यांनी सांगितले. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. केवळ अहंकारातून हा प्रकार घडत आहे. मात्र यामध्ये मुलांचे मोठे नुकसान होते. मुले एकाकी पडतात, असे त्या म्हणाल्या. तेव्हा प्रत्येकाने याबाबत गांभीर्याने विचार करून घटस्फोटासारखे निर्णय घेऊ नयेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या.