‘विद्यागम’ही सुरू करणार ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास शाळा ‘ऑनलाईन’ चालविण्यासाठी ‘विद्यागम’ची तयारी करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.
शाळा सुरू होऊन केवळ दोन महिने 18 दिवस झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात येऊ नये, यासाठी खात्याने तयारी चालविली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने वर्ग चालणार आहेत. ऑनलाईन वर्गांसाठी स्क्रिन टाईम निश्चित केला जाणार आहे. शिक्षकांना त्यासाठी त्यांच्याकडील संगणकीय उपकरणांचा वापर करायचा आहे. विद्यार्थीही संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून वर्गांना हजेरी लावू शकणार आहेत.
ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे, तसेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत त्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकविले जाणार आहे. विद्यागमच्या माध्यमातून 20 ते 25 विद्यार्थ्यांच्या गटाचे वर्ग चालणार आहेत. शाळेच्या आवारात आठवडय़ातील पाच दिवस वर्ग चालतील. घरात पालकांनी विद्यार्थ्यांचा गृहपाठ घ्यावा, असेही आवाहन खात्याकडून करण्यात आले आहे. विद्यागममधील विद्यार्थ्यांसह ऑनलाईन असणाऱया विद्यार्थ्यांनाही शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याबाबत खात्याचा विचार सुरू आहे.
विद्यागम का?
– गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळणे
– शैक्षणिक विकासासाठी पूरक
– बालविवाह आणि बालकामगारांना आळा घालणे शक्मय
दक्षता घेणे आवश्यक
– शिक्षकांना दोन्ही मात्रा बंधनकारक
– मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन
– विद्यागमसाठी पालकांची परवानगी आवश्यक
– आजाराची लक्षणे असलेल्या विद्यार्थी-शिक्षकांना परवानगी नाही