गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते, पायवाटा सील करणार. शिरगाव पंचायतीतर्फे पोलीस स्थानकाला पत्र. पाच दिवशीय ब्रह्मश्चर्य पाळणाऱया धोंडगणाचे व्रत सुरू. घरातच आपापल्या व्रताला न्याय देण्यास धोंडगणही सज्ज.
डिचोली / प्रतिनिधी
28 एप्रिल रोजी शिरगाव गावातील प्रसिद्ध देवी लईराईचा जत्रोत्सव यावषी कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्याचा निर्णय जरी श्री लईराई देवस्थान समितीने जाहिर केले असले तरी जत्रोत्सवाच्या दिवशी गावात कोणीही येऊ नये व शासनाने लागू केलेल्या कायदा व नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी संपूर्ण गावात प्रवेश करणारे रस्ते व पायवाटा सील करण्याची प्रक्रिया आता शिरगावात हाती घेण्यात येणार आहे. यावषी जत्रोत्सव होणार नसल्याने मनाची तयारी करीत शिरगाव गावातील लोकांनीही शासनालापूर्ण सहकार्य जाहीर केले आहेच. शिवाय राज्यभारत विविध भागात विखुरलेल्या देवीच्या असंख्य धोंडगणांपैकी देवीचे पाच दिवस सोवळे व्रत पाळणाऱया धोंडगणांनी आपापल्या घरातच सोवळे व्रत पाळयास प्रारंभ केला आहे.
कोरोनच्या महामारीमुळे राज्यातील सर्वच सण उत्सवांवर संक्रांत आली असून त्यातून शिरगावची प्रसिद्ध देवी लईराईची जत्राही सुटली नाही. ही जत्राही रद्द करण्याची नोटीस देवस्थान समितीला जारी करावी लागली. तसेच या जत्रोत्सवात देवीचे सोवळे व्रत पाळणाऱया असंख्य धोंडगणांनाही दरवषीप्रमाणे यावषी एकत्रित राहण्यास मज्जाव असल्याने त्यांनीही या व्रताला आपल्या घरीच उपवास पाळून न्याय देण्याची सुचना करण्यात आली आहे.
शिरगाव गावात प्रवेश करणारे मार्ग बंद करा. पंचायतीतर्फे पोलिसांना पत्र.
शिरगावात जत्रोत्सवाच्या दिवशी कोणीही प्रवेश करू नये व कायद्याचे उल्लंघन करू नये यासाठी शिरगाव पंचायतीने डिचोली पोलीस स्थानकाला पत्र लिहून शिरगाव गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते अडविण्यात यावे अशी मागणी केली आहे. मानसवाडा मुळगाव ते शिरगाव, अस्नोडा पुल ते शिरगाव, ब्राह्मण देवस्थान पैरा ते शिरगाव, सिध्दीविनायक मंदिर पैरा ते शिरगाव व रेल्वे पुल पैरा ते शिरगाव असे शिरगावात प्रवेश करणारे प्रमुख पाच मार्ग 24 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात बंद करण्यात यावे अशी मागणी पंचायतीने पोलीस स्थानकाकडे केली आहे.
हजारो वर्षांची परंपरा असलेली हि जत्रा पोर्तुगीज काळातही कधी रद्द झाली नव्हती, मात्र आज कारणच वेगळे असल्याने या गावातील हि प्रसिद्ध जत्रा रद्द करावी लागत आहे. या जत्रोत्सवात कशा प्रकारे व्रत पाळावे याचे मार्गदर्शन देवस्थान समितीने केले आहेच. तरी भाविक भक्तजनांनी व धोंडगणांनी जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावातील सर्व मार्ग बंद केले जाणार असल्याचे शिरगावात येण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन शिरगावचे सरपंच भगवंत गावकर यांनी केले आहे.
देवी आपल्या घरातच येऊन दर्शन देणार अशी भावना ठेवावी.
जत्रोत्सव रद्द करण्यात आल्याने देवीचे मंदिर बंदच राहणार आहे. त्यामुळे शिरगाव गावातील लोकांनीही आपल्या घरातून बाहेर न पडता आपल्याच घरात रहावे. शिरगावातील सर्व ग्रामस्थां®³ाा घरांमध्ये देवीचा फोटो आहेच. त्या फोटोलाच मोगरीचे कळे अर्पण करून देवीचे नामस्मरण करावे, आणि यावषी देवी आपल्या घरातच दर्शन देण्यासाठी आली आहे. अशी श्रद्धा भावना मनात निर्माण करावी, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर यांनी केले आहे.
शिरगावात सीआरपीएफ पोलीस तैनात
शिरगाव गावात जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीआरपीएफ पोलीस दलाची पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गावातील सर्व सीमा सील करण्यात येणार असल्याने गावात चोरटय़ा मार्गाने किंवा पायवाटांतून कोणी आत शिरू नये यासाठी पोलिसांना काळजी घ्यावी लगणार आहे. या कार्यात गावातील लोकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी ठेवली असून गावात कोणीही बाहेरचे लोक प्रवेश करू नये यासाठी गावातील युवा मंडळी व लोकही पहारा देणार आहे, असे समजते.
पाच दिवसांचे व्रत पाळणाऱया धोंडगणांच्या व्रताला घरातच प्रारंभ.
या जत्रोत्सवात नवीन धोंड म्हणून रूजू झालेले गण हे प्रथम पाच वर्षे सोवळे व्रत पाळतात. तर जुने धोंडगण हे तीन दिवशीय व्रत पाळतात. त्याप्रमाणे ज्यांना पाच वर्षांत पूर्ण न झालेल्या धोंडगणांकडून आपल्या कडक सोवळे व्रताला काल शुक्र. दि. 24 एप्रिल रोजी पासून प्रारंभ झाला. या धोंडगणांनी शिरगाव येथील श्री लईराई देवस्थान समितीच्या आवाहनाला मान देताना आपल्या सोवळे व्रताला आपापल्या घरातूनच सुरूवात केली आहे. कालपासून अनेक धोंडगणांनी सकाळीपासून या व्रताच्या दरम्यान करण्यात यावयाच्या सर्व गोष्टी पाळल्या तसेच स्वतः स्वयंपाक करीत ओल्या अंगी जेवण ग्रहण केले. रवि. दि. 26 एप्रिल रोजीपासून तीन दिवशीय धोंडगणांच्या सोवळे व्रताला प्रारंभ होणार आहे.
यावषी नवीन धोंडगण रूजू होणार नाही.
या जत्रोत्सवात दरवषी मोठय़ा संख्येने नवीन धोंडगणांची भर पडत असते. हे धोंड देवीचे नामस्मरण करून इतर जे÷ धोंडगणांच्या मार्गदर्शनाखाली लोकवस्तीपासून दचर राहताना सोवळे व्रत पाळतात. जत्रेच्या दिवशी देवीची चिरा मुख्य मंदिरातून मुड्डी येथील मुळ आधि÷ानात नेण्यात आल्यानंतर तेथे नवीन धोंडगणांना मानवून घेतले जाते. त्यानंतर सदर धोंडगण हा देवीच्या चरणी धोंडगण म्हणून रूजू होतो. मात्र यावषी देवीचा जत्रोत्सवात संपन्न होणार नसल्याने नवीन धोंडगण रूजू होऊ शकणार नाही. त्यामुळे नवीन धोंडगण राहण्याची शक्मयता फारच कमी आहे.
शिरगावात पैरा येथील सिध्दीविनायक मंदिराकडून खाणीवरून येणाऱया मार्गावर अडथळे निर्माण करून सदर रस्ता आताच अडविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे गावतील इतरही रस्ते अडविण्यात येणार आहेत. सध्या शिरगावात वातावरण शांत असून धोंडाची पवित्र तळीही शांत दिसून येत आहे.