आपचे सुरेल तिळवे यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
शिरदोन समुद्र किनाऱयावर एका अर्भक मुलीचा छिन्नविछीन्नावस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. एक आठवडा उलटूनसुद्धा पोलिस चौकशीत काहीच समोर आले नाही, असे दिसून येते की पोलिस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी सांगितले
गोव्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आणि गुन्हेगारांना कशाचेच भय उरले नाही आणि म्हणूनच सरासपणे एखाद्या अर्भकाचा खून करून त्याला समुद्रकाठी पुरण्यासारखी गोष्ट घडत आहे. त्यामुळे गोव्यात मुले, महिला किती असुरक्षित आहे हे दिसून येते. असे तिळवे यांनी अधिक बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याला उत्तर प्रदेश बनविण्याचा विचार करत आहे का? महिलांवरील भयंकर गुह्यांचे मालिकासत्र आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची निषक्रियता सर्वांसमोर आलेलीच आहे. ‘बेटी बचाओ’च्या भाजपच्या घोषणा आता निष्क्रीय ठरत आहे. असेही सुरेल तिळवे पुढे बोलताना सांगितले
ह्या गंभीर प्रश्नावर गोवा पोलीस काहीच भाष्य करत नाहीत, पोलिसांना तपासासाठी एवढा वेळ का लागत आहे? मागील आठ दिवसांपासून ते काय करीत आहेत? समुद्रकिनाऱयावर पोलिस गस्त ही नियमित गोष्ट आहे, तर ह्या प्रसंगी ते काय करीत होते? अशा प्रश्नांचा भाडीमारच तिळवे यांनी यावेळी केला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे असेही तिळवे पुढे म्हणाले.