प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील शिवनिश्चय तालिमच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला. मागील महिन्याभरापासून युवा शिवभक्तांनी बलिदान मासचे आचरण करून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती करून घेतली.
अध्यक्ष सूरज बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली बलिदान मास आचरण्यात आला. नामदेव पिसे यांनी आपले विचार मांडत शंभूराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून जगणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी जय इंजल, शिवराज गौंडाडकर, सौरभ खांडेकर, निखिल पेडणेकर, षण्मुख चंदगडकर यांच्यासह तालमीचे सर्व सदस्य उपस्थित होते.