ऑनलाइन टीम / मुंबई :
शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. मात्र शिवभोजन थाळी दुपारी 12 ते 2 एवढय़ाच कालावधीमध्ये उपलब्ध असणार असून थाळीच्या योजनेमध्ये विविध अटी घालण्यात आल्या आहेत.
यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘थाळीच्या अटी बघून भूक मरेल.’
नितेश राणे म्हणतात, थाळीवर घालण्यात आलेल्या अटी बघूनच भूक मरेल. तसेच शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा असा टोला देखील निलेश राणेंनी शिवसेनेवर लगावला आहे.