बेळगाव : एकीकडे प्रशासन विजेची बचत करा असे सांगत असले तरी त्यांच्याच विभागांकडून मात्र अपव्यय करण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी रामलिंगखिंड गल्ली शिवाजी रोड परिसरात दिवासाही पथदीप सुरू ठेवण्यात आले होते. संबंधित विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आलेले पथदीप सोमवारी सकाळी बंद करण्यात आले नाहीत. दिवसभर विनाकारण पथदीप सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी दिलेल्या कराच्या पैशांचा अशाप्रकारे गैरवापर होत असल्याने नाराजीचा सूर उमटत होता. दिवसा पथदीप सुरू आणि रात्रीच्यावेळी बंद असे प्रकार शहरात नेहमीच दिसून येत आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
Previous Articleमहाराष्ट्रात 4,153 नवे कोरोना रुग्ण; 30 मृत्यू
Next Article आधार सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष देसाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.