नवी दिल्ली : ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्राकडून नुकतीच जलवायू बदलासंदर्भात परिषद पार पडली आहे. यामध्ये परिवहन दिवसाचे औचित्य साधून दुचाकी व तिचाकी वाहनांवर मोठय़ा प्रमाणात शून्य कार्बन उत्सर्जनात बदलण्यावर भारत भर देणार असल्याची माहिती आहे.
नीति आयोगाने शून्य उत्सर्जन वाहनांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तेजी प्राप्त करण्यासाठी भारत नवनवीन योजना आखणार असल्याचे म्हटले आहे. एक दिवस अगोदर भारताने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक विशेष पोर्टल ई-अमृत सुरु केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात सर्व सूचना देण्यात आली आहे.
दुचाकी व तिचाकीची हिस्सेदारी
देशात एकूण वाहनांमध्ये जवळपास 80 टक्के दुचाकी व तिचाकी वाहने शून्य उत्सर्जन वाहनात बदलली जाणार आहेत. यासाठी भारत विशेष मोहिम आखणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.