प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय मुस्लीम सोशल एकॉनॉमिक डेव्हल्पमेंट फोरमच्यावतीने शेरीया वाद निवारण मंचची स्थापना केली आहे. या शेरीया मंचमधून लहान-मोठे खटले निकालात काढले जाणार आहेत. बऱयाचवेळा लहान-मोठे वाद निर्माण होतात. मात्र, न्यायालयात गेल्यानंतर ते निकालात काढण्यासाठी बराच उशीर लागतो. त्यामुळेच या मंचची स्थापना करण्यात आली आहे.
रविवारी फक्र मिल्लत हॉल-कोतवाल गल्ली येथे कार्यक्रम झाला. मंचचे अध्यक्ष म्हणून वकील इक्बाल अहमद मुल्ला यांची निवड करण्यात आली. या मंचमध्ये मुफ्ती कासम नसरादीसाब, मुफ्ती अब्दुलरेहमान नाजमी यांच्यासह एक निवृत्त न्यायाधीश आणि महिला वकीलही न्याय देण्याचे काम करणार आहेत.
इस्लामिक इंडियन लॉ आणि उच्च न्यायालयाच्या कायद्याच्या चौकटीत हे निकाल काढले जाणार आहेत. लहान-मोठे वादाचे खटले या मंचमधून निकालात काढण्यात येणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हफीज नजीरउल्ला कादरी, निवृत्त प्राचार्य घोरी, ऍड. नसरीन दस्तगीर आगा, निवृत्त न्यायाधीश इक्बाल पिरजादे, मुस्ताकहुसेन फारुकी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.