प्रतिनिधी / संकेश्वर:
गेल्या तीन वर्षापासून शहरात सीसीटीव्ही पॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. पण व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणतेच नियोजन नसल्याने हा तिसरा डोळा सध्या बंद अवस्थेत आहे. परिणामी चोऱयांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. शहरातील प्रमुख अशा 16 ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसवून शहरातील हालचालीवर नजर ठेवण्यास मदत होणार होती. पण आता व्यवस्थापन कोण करायचे? हाच मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कर्नाटक, गोवा, व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना संपर्काच्या दृष्टीने जोडणारा मध्यवर्ती दुवा म्हणून संकेश्वरकडे पाहिले जाते. दररोज हजारोंच्या संख्येने येथून प्रवाशांची वर्दळ होत असते. शहराच्या भोवताली कर्नाटक व महाराष्ट्रातील शंभर खेडी आहेत. या परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून संकेश्वरकडे पाहिले जाते. तीस सहकारी पतसंस्था, दहा राष्ट्रीयकृत बँका, फायनान्स व अलिकडेच सहाय्य संघाच्या नावे चालणाऱया आर्थिक संस्था, सोने-चांदीची बाजारपेठ, धान्याची घाऊक बाजारपेठ व मोठी अशी भाजीपाला बाजारपेठ इतका उद्योग या शहरात आहे. पण सध्या दुचाकी, कार व कारमधील टेपरेकॉर्डर यांची चोरी होत असल्यामुळे शहर असुरक्षित वाटू लागले. या चोऱयांना आळा घालण्याच्यादृष्टीने संकेश्वर पोलीस व नगरपरिषदेतर्फे संयुक्त बैठक घेऊन सीसीपॅमेरे बसविण्याचा निर्णय सन 2017 मध्ये घेण्यात आला व नगरपरिषदेने पॅमेरेही बसविले.
पॅमेरे बसविल्यानंतर दोन ते तीन महिने तिसऱया डोळय़ाची नजर संपूर्ण शहरावर फिरकली. पण सुमारे अडीच वर्षापासून या तिसऱया डोळय़ाचे काम बंद पडले. मात्र दुरुस्तीकडे कोणीच लक्ष दिले नाही. या बंद सीसी कॅमेऱयाचा फायदा घेऊनच नोव्हेंबर महिन्यात फुल्लट्रॉन फायनान्स कार्यालय चोरांनी लुटले. त्यानंतरही लहानसहान चोरीच्या घटनाही घडल्या आहेत.
कॅमेऱयाच्या व्यवस्थापनासाठी निधी नाही
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीपॅमेरे महत्त्वाचे आहेत. शिवाय पोलिसांनी सतत पॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही गरज भागविण्यासाठी निधी नसतानाही पाच लाख रुपये खर्च करून शहरातील 16 महत्त्चाच्या व वर्दळीच्या ठिकाणी पॅमेरे बसविले आहेत. पण या पॅमेऱयांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याकडे निधी नाही. हा खर्च पोलीस खात्यानेच करायला हवा, सध्या बंद पॅमेरे सुरळीत करून देऊ. पण यानंतर पुन्हा नादुरुस्त झाल्यास नगरपरिषद जबाबदार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी दिली.