नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा जगभरातील वाढता संसर्ग यामुळे याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पहावयास मिळत आहे. यात वीजेच्या मागणीचा सर्वात मोठा घटक आहे. एका आठवडय़ाच्या आतच देशातर्गत वीजेच्या मागणीत मोठी घट झाल्याची माहिती उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी दिली आहे. ही घट जवळपास 26 टक्क्मयांहून अधिक झाली आहे. मागील गुरुवारी देशातील अत्यावश्यक गरजेची वीजेची मागणी 120.31 गीगावॅट होती. जी 20 मार्च रोजी 163.72 गीगावॅट होती. या प्रकारे मागील शुक्रवारनंतर अत्यावश्यक विजेची मागणी 43 गीगावॅटने कमी झाली आहे. प्रामुख्याने लॉकडाउनच्या कारणामुळे देशात उद्योग आणि स्टेट पॉवर डिस्ट्रिब्यूशन कंपन्यांकडून (डिस्कॉम्स) मागणी कमी राहिल्याच्या कारणामुळे अत्यावश्यक कालावधीत वीज मागणीत घसरण झाली आहे. सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशाला कोरोनाच्या विळख्यापासून लांब ठेवण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली आहे. मागील आठवडय़ात 20 मार्चपासून 163.72, 161.74, 135.20 (जनता कर्फ्यू),145.49, 135.93, 127.96 गीगावॅट आणि 26 मार्च रोजी 120.31 गीगावॅट वीज मागणीची नोंद आहे.
Previous Articleजिह्यात होम क्वारंटाईनची संख्या वाढतीच!
Next Article जिल्हा विशेष कारागृहातील 13 कैद्यांना पॅरोल