वाळपई भागात नागरिकांची अल्प वर्दळ
प्रतिनिधी / वाळपई
सरकारने जारी केलेल्या संचारबंदी सत्तरी तालुक्मयात 50 टक्के प्रतिसाद लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. खासकरून वाळपई भागांमध्ये अनेक दुकाने बंद होती तर काही प्रमाणात अनेकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यामुळे दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी अल्प प्रमाणात भागांमध्ये हजेरी लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याबाबतची माहिती अशी की गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणारी रुग्णांची संख्या या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी संध्याकाळी पासून ते सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. या संचारबंदीचा वापर वाळपई भागात 50 टक्के प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाळपई शहराचा फेरफटका मारला असता कपडय़ाची दुकाने, हॉटेल्स बंद असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर औषध विक्रीची दुकाने सत्तरी बाजार दारूची दुकाने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तरीसुद्धा वाळपई शहरांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट होता. दरम्यान संचारबंदीच्या बाबतीत पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी सत्तरी तालुक्मयाचे वेगवेगळय़ा भागांमध्ये फेरफटका मारून या संदर्भाची माहिती दुकानदारांना व नागरिकांना दिली होती. तरीसुद्धा काही प्रमाणात अनेकांमध्ये संभ्रमित अवस्था निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले .यामुळे कोणती दुकाने सुरू व कोणती दुकाने बंद याबाबतची माहिती न मिळाल्यामुळे संभ्रमित अवस्था निर्माण झाली. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वाळपई येथील हॉटेल मालक पांडुरंग नाईक यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. सरकारने जारी केलेली संचारबंदी निश्चित कशासाठी व कोणासाठी अशाप्रकारचा सवाल त्यांनी व्यक्त केला. संचारबंदी संदर्भात व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे नको असलेली दुकाने सुरू होती व गरज झाली दुकाने बंद होती अशा प्रकारची परिस्थिती वाळपई शहरांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले .त्याचप्रमाणे वाळपई येथील आणखीन एक व्यवसायिक अल्ताफ यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारची संचारबंदी म्हणजे सर्वसामान्याच्या डोळय़ांमध्ये धचळफेक करणारी प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केल. महत्त्वाचे म्हणजे दारूची दुकाने सुरू करून सरकारने कोणत्या प्रकारची संचारबंदी जारी केली असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला .त्यामुळे अशा प्रकारची संचारबंदी लागू करून सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करण्याऐवजी सरकारने संचारबंदीत लागू करू नये किंवा कडक संचारबंदी लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान वाळपई पोलिस स्थानकाचे अधिकाऱयांशी संपर्क साधला असता सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा पंधरा ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. सरकारने केलेली संचारबंदी याचे पालन करावे यासाठी 25 ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती नसून सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे यावेळी ते म्हणाले. सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सरकारने जारी केलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे. यापुढेही अशा प्रकारचे सहकार्य करून या भागांमध्ये वाढणारी रोगाची संख्या नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलेली आहे.