प्रतिनिधी/ बेळगाव
संबरगी (ता. अथणी) ग्राम पंचायतीत अनुदानाचा नियमबाहय़ वापर झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
नागनूर पी. ए. येथील कुमार श्रीशैल कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे एक निवेदन दिले आहे. या निवेदनाबरोबरच आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची कागदपत्रे जोडण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्राम पंचायत अध्यक्ष व पीडीओ यांच्या विरोधात आरोप करण्यात आला आहे. पथदीपांची वीजबिले भरण्यासाठी ग्राम पंचायतीच्या खात्यात सरकारकडून जमा झालेले 10 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या निधीचा वापर कोणत्याही विकासकामासाठी झाला नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून निधीचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.