ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय जनता पार्टीचे पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. वरुण गांधींनी राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध करतानाच अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर टीका केलीय. शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ मी उभा आहे. इतर कोणत्याही खासदाराने याविरोधात उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही, असं वरुण गांधी म्हणाले आहेत. तसेच “बँकांचे खासगीकरण झालं तर १० लाख लोक बेरोजगार होतील. त्यांना पुन्हा नोकऱ्या कोण देणार? त्यांच्या मुलांच्या अन्नपाण्याची सोय कोण करणार? जर बीएसएनएस, एमटीएनएल, विमानतळं, विमान कंपन्या असं सगळं काही विकून टाकलं तर सामान्य माणसाच्या मुलांना नोकऱ्या कोण देणार?,” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.