ग्रहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले कारवाईचे आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
येथील सदरबाजार परिसरात गेल्या काही वर्षांपासून खुले आम कत्तलखाना सुरू आहे.या कत्तलखान्यातले मांसाचे तुकडे त्या परिसरातील घराच्या छतावर घरात पडतात.धार्मिक तेढ निर्माण होण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.तत्पूर्वीच शहरी भागातील कत्तल खाना बंद करण्यात यावा, अशी मागणी धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.मंत्री देसाई यांनी कारवाई करू, असे आश्वासन दिले.
प्रशांत नलावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शांत सातायाची ओळख आहे. याचाच गैरफायदा काही लोक घेतात.सदरबाजार या परिसरात गेल्या काही वर्षांपासून कत्तलखाना सुरू आहे.या कत्तलखान्यात जनावरांच्या कत्तली केल्या जातात.हा कत्तलखाना सध्या छुप्या पद्धतीने सूरु आहे.त्या परिसरात काही हिंदू बांधव राहतात.त्यांच्या घरावर काही समाजकंटक मांसाचे तुकडे टाकतात.दारात टाकतात.त्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाहीत.त्यामुळे विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार घडू शकतो त्यामुळे कारवाई करून हा कत्तलखाना बंद करावा, अशी मागणी करताच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशी करतो सांगितले तर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी कारवाई करतो असे आश्वासन दिले.