ऑनलाईन टीम / जकार्ता :
म्यानमारमधून हकालपट्टी करण्यात आलेले जवळपास 300 रोहिंग्ये समुद्रमार्गे प्रवास करत इंडोनेशियात दाखल झाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित विषयक विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
या रोहिंग्यांना लष्करी सामर्थ्याच्या जोरावर तीन वर्षांपूर्वी म्यानमारमधून हाकलून देण्यात आले होते. त्यानंतर इंडोनेशिया आणि मलेशिया हे देश त्यांच्यासाठी आश्रयस्थाने ठरली होती. फेब्रुवारी 2020 ला त्यांनी बांग्लादेशातील कोक्स बझार येथून सागरी प्रवासाला सुरुवात केली होती. सात महिन्यानंतर ते इंडोनेशियात पोहचले.
म्यानमारमधून हकालपट्टी झाल्यानंतर तीन वर्षात रोहिंग्यांनी भारत, बांगलादेशबरोबर अन्य काही देशात आश्रय घेतला. एका लाकडी बोटीतून हे सर्वजण सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडेला असलेल्या लोकसेमवे शहराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. आतापर्यंतचा हा त्यांचा सर्वाधिक लांबचा पल्ला होता. प्रवासादरम्यान या रोहिंग्यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला.