भर उन्हात विविध मागण्यांसाठी केले आंदोलन
प्रतिनिधी / बेळगाव
आशा कार्यकर्त्यांना आरोग्य विभागातर्फे विविध कामांना जुंपण्यात येत आहे. मात्र, त्यांना देण्यात येणारे वेतन तुटपुंजे आहे. यामुळे आशा कार्यकर्त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. यातच आता ई-सर्व्हे करा म्हणून फतवा काढण्यात आला आहे. हा सर्व्हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन करायचा आहे. ते करणे अशक्मय असून इतर सरकारी कर्मचाऱयांवर ही जबाबदारी घाला म्हणून आशा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
कोरोना काळात आशा कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केले आहे. आताही कोरोनाबाबत जनजागृती तसेच इतर कामे करण्यात येत आहेत. परत आता ई-सर्व्हे करा म्हणून जबाबदारी टाकण्यात येत आहे. मात्र, ही जबाबदारी स्वीकारण्यास आशा कार्यकर्त्या तयार नाहीत. या सर्व्हेमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गणती करायची आहे. इतर सरकारी कर्मचाऱयांवर जबाबदारी न टाकता आम्हालाच ही जबाबदारी का देण्यात येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
केवळ सहा-सात हजार रुपये वेतन देऊन आमची दिशाभूल करण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱया सर्व योजना आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आता को-व्हॅक्सिन घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे, असा फतवा काढला आहे. वास्तविक कोणावरही जबरदस्ती करणे चुकीचे आहे. यामुळे आम्हाला वादाला सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा हे कामही आम्ही करणार नाही, असे ठामपणे आशा कार्यकर्त्यांनी सांगितले.
सरदार्स मैदानावर भर उन्हातच लहान मुलांना घेऊन महिला उपस्थित होत्या. आशा कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे सरदार्स मैदानावरच जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी त्यांचे निवेदन स्वीकारले आहे. यावेळी संघटनेचे राज्य कार्यदर्शी डी. नागलक्ष्मी, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जडगण्णावर, कार्यदर्शी गीता रायगोळ यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.