सांगली / प्रतिनिधी :
भाजप सरकारने धनगर आणि ओबीसी सामाजाच्या सर्वांगीण विकासासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ५०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ उपलब्ध करावा. या निधी मधून ओबीसींच्या प्रलंबित योजना मार्गी लावाव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अमर पडळकर यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.
ओबीसी समाजाच्या प्रलंबित योजना, सवलती याबाबत समाजकल्याण कडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पडळकर यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, ओबिसी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई शेळके,अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शहानवाज सौदागर, व जिल्हा सरचिटणीस रोहीत घुबडे-पाटील ,युवक अध्यक्ष राहुल माने आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागात जात माहिती घेतली. समाजकल्याणमधे येणार्या सर्व कर्ज योजना जनते पर्यंत पोहोचवा. ओबीसी प्रवर्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला.