प्रतिनिधी / कडेगाव
कोरोना काळातील वीज बिल माफ करा, शेती पपांना दिवसा सलग ८ तास विज दया, शेतकरी यांना पोलव्दारेच विज पुरवठा करा, सौर उर्जेची योजना बंद करा, लोंबकळणाक्या तारा तातडीने दुरूस्ती करा या प्रमुख मागण्यांसह कडेगाव शहरातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने विज बिलांची होळी विज वितरण कार्यालयाच्या समोर करण्यात आली.
यावेळी डि. एस. देशमुख, युन्नूस पटेल, संतोष डांगे, शिवलिंग सोनवणे, जीवन करकटे, दिपक न्यायनित, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र थोरात, दादासाहेब माळी, युवराज मोरे, युवराज देसाई यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.