40 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 238, ग्रामीण भागात 627 रूग्ण वाढलेः
प्रतिनिधी / सांगली
बुधवारी जिल्हय़ात नवीन 865 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्येने 25 हजार 653 हा आकडा गाठला आहे. दिवसभरात 613 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 40 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 38 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 969 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. तर आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रूग्णांची संख्या 15 हजार 437 झाली आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णसंख्या 11 हजार 74
महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन रूग्ण मोठय़ासंख्येने वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात 238 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 179 तर मिरज शहरात 59 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 11 हजार 74 झाली आहे.
ग्रामीण भागात 627 रूग्ण वाढले
बुधवारी ग्रामीण भागात 627 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 39, जत तालुक्यात 30, कडेगाव तालुक्यात 74 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 55, खानापूर तालुक्यात 29, मिरज तालुक्यात 143 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 65, शिराळा तालुक्यात 45, तासगाव तालुक्यात 65 आणि वाळवा तालुक्यात 69 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 38 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 38 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर कुपवाड येथील एकाचा मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील तिघा व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जणांचा, खानापूर तालुक्यातील दोन आणि मिरज ग्रामीण भागातील दोन जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील तीन जणांचा, तासगाव तालुक्यातील दोघांचा, शिराळा तालुक्यातील तीन जणांचा आणि वाळवा तालुक्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण 38 जणांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 969 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया एकाचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हय़ातील कराड येथील दोन व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 141 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
आजपर्यंत 15 हजार 437 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्हय़ात बुधवारी 613 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 15 हजार 437 झाली आहे. जवळपास 60 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हय़ात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हय़ाला हा दिलासा मिळत आहे.
3316 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हय़ात बुधवारी तीन हजार 316 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 1319 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार नऊशे 97 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 865 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 25653
बरे झालेले 15437
उपचारात 9247
मयत 969