प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात नवीन 506 रूग्ण वाढले. तर दिवसभरात त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 998 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 23 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील 22 आणि परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. एकूण जिल्ह्यात 1331 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 131 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात 131 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 101 तर मिरज शहरात 30 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 14 हजार 46 झाली आहे. महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या आता घटू लागली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागात 375 रूग्ण वाढले
मंगळवारी 375 नवे रूग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 27, जत तालुक्यात 39, कडेगाव तालुक्यात 15 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 35, खानापूर तालुक्यात 28, मिरज तालुक्यात 75 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 34, शिराळा तालुक्यात 16, तासगाव तालुक्यात 53 आणि वाळवा तालुक्यात 53 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 22 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 22 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील दोघांचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील एकाचा, पलूस तालुक्यातील एकाचा, शिराळा तालुक्यातील दोघांचा, तासगाव तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील तब्बल पाच जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजअखेर 1331 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू
परजिल्ह्यातील नवीन 16 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे सहा, बेळगावचे पाच, रत्नागिरीचा एक, पुण्याचा एक आणि सातारा येथील तिघेजण आहेत. तर उपचार सुरू असताना कराड तालुक्यातील मलकापूर येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 177 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. परजिल्ह्यातील 1169 जणांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात आले त्यामध्ये 733 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 259 जणांच्यावर उपचार सुरू आहेत.
998 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात मंगळवारी विक्रमी 998 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 27 हजार 75 झाली आहे. जवळपास 75 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच सलग दहा दिवस कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्ह्याला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे ही अत्यंत चांगली गोष्ट घडत चालली आहे.
2546 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात मंगळवारी दोन हजार 546 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 757 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 1789 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 506 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 35826
बरे झालेले 27075
उपचारात 7420
मयत 1331