प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात नवे 299 रूग्ण वाढले तर दुप्पटीपेक्षा अधिक 795 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हÎात आजअखेर 31 हजार 301 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात एकूण रूग्णसंख्या 38 हजार 817 झाली आहे. तर रविवारी उपचार सुरू असताना 19 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर एक हजार 422 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णसंख्या 15 हजार पार
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन 68 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 36 आणि मिरज शहरात 32 रूग्ण वाढले आहेत. रविवारी 68 रूग्ण वाढल्याने महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णसंख्येने 15 हजाराचा आकडा पार केला आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसापासून वाढणाऱया रूग्णसंख्येचा आकडा हा शंभरच्या आत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला चांगलाच दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागात 231 रूग्ण वाढले
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या मात्र वाढतच आहे. रविवारी ग्रामीण भागात 231 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात सध्या ऍण्टीजन टेस्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे हे रूग्ण वाढत चालले आहेत. रविवारी वाढलेले रूग्ण तालुकानिहाय असे आटपाडी 29, जत 20 कडेगाव तालुक्यात 30 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळमध्ये 29, खानापूर येथे सहा, तर मिरज ग्रामीण भागात 22 नवीन रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 13, शिराळा तालुक्यात 21 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 19 तर वाळवा तालुक्यात सर्वाधिक 42 रूग्ण वाढले आहेत. तपासले.
जिल्ह्यातील 19 जणांचा मृत्यू
रविवारी जिल्ह्यातील 19 जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील दोन जणांचा आणि मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यातील एकाचा तर कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील एकाचा तर शिराळा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील तीन जणांचा तर वाळवा तालुक्यातील तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजअखेर एक हजार 422 जणांचा बळी गेला आहे.
दोन हजार 365 स्वॅब तपासले
जिल्हÎात रविवारी दोन हजार 365 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 378 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर आरटीपीसीमध्ये 987 जणांचे स्वॅब तपासले आहेत. त्यामध्ये 299 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
उपचारातील रूग्ण 6094
जिल्हÎात सध्या कोरोनाने मुक्त होणाऱया रूग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्याही आता घटू लागली आहे. पंधरा दिवसापुर्वी दहा हजाराच्या आसपास रूग्णांच्यावर जिल्हÎात उपचार सुरू होते आता उपचारातील रूग्ण संख्या सहा हजार 94 इतकी कमी झाली आहे. ही दिलासा देणारी बाब ठरत आहे.
31 हजार 301 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्हÎातील 38 हजार 817 रूग्णापैकी 31 हजार 301 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्केच्यावर गेले आहे. रविवारी जिल्हÎातील 795 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे सलग पंधरा दिवस नवीन रूग्णापेक्षा बरे होणाऱया रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
परजिल्ह्यातील नवे 10 रूग्ण दाखल
जिल्हÎात उपचारासाठी परजिल्हÎातील नवे 10 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हÎातील सहा, बेळगाव जिल्हÎातील दोन, मुंबई येथील एक आणि वर्धा येथील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्हÎातील एक हजार 230 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले. त्Îातील 891 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचारात 159 रूग्ण आहेत. तर आजअखेर 180 रूग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
नवीन रूग्ण 299
उपचारातील रूग्ण 6094
बरे झालेले रूग्ण 31301
एकूण रूग्ण 38817
एकूण बळी 1422