429 कोरोनामुक्त : सांगली शहरात 175 वाढलेः खानापूर तालुक्यात 202 उंच्चाकी रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. उपचार सुरू असणाऱया 22 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर नवीन रूग्णवाढीचा वेगही वाढला आहे. नवीन एक हजार 116 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 175 तर मिरज शहरात 64 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 429 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात आठ हजार 996 रूग्ण आहेत.खानापूर तालुक्यात 202 ही उंच्चाकी रूग्णसंख्या वाढली आहे. तर वाळवा तालुक्यात 184 तर मिरज तालुक्यात 105 रूग्ण वाढले आहेत.
महापालिका क्षेत्रात 239 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. बुधवारी महापालिका क्षेत्रात नवीन 239 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 175 तर मिरज शहरात 64 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 20 हजार 535 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 78 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात तब्बल 877 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर एकाच दिवशी तब्बल 877 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात तर एकाच दिवशी 202 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात 184 तर मिरज तालुक्यात 105 रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात 47 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 58 तर कडेगाव तालुक्यात 81 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 35, तासगाव तालुक्यात 95 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 32 तर शिराळा तालुक्यात 38 रूग्ण आढळून आले आहेत.
उंच्चाकी 22 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात बुधवारी तर उंच्चाकी मृत्यू झाले आहेत. एकाच दिवशी 22 जणांना कोरोनाने प्राण गमावावे लागले आहेत. महापालिका क्षेत्रात सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरातील पाच आणि मिरज शहरातील एकाचा जणांचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यात तीन रूग्ण दगावले आहेत. पलूस तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एक तर मिरज तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात एक, वाळवा तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 991 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.72 टक्के झाला आहे.
429 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 429 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 64 हजार 293 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 53 हजार 306 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 1116
उपचारात 8996
बरे झालेले 53306
एकूण 64293
मृत्यू 1991
बुधवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 58
कडेगाव 81
खानापूर 202
पलूस 35
तासगाव 95
जत 47
कवठेमहांकाळ 32
मिरज 105
शिराळा 38
वाळवा 184
सांगली शहर 175
मिरज शहर 64
एकूण 1116
लसीकरण
आजचे लसीकरण 24952
आजअखेर लसीकरण 455724