प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 936 रूग्ण वाढले आहेत. तर विक्रमी 875 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 36 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 798 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम हेही कोरोनाने बाधित झाले आहेत.
महापालिका क्षेत्रात 210 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन 210 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 137 तर मिरज शहरात 73 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या नऊ हजार 785 झाली आहे.
ग्रामीण भागात 726 रूग्ण वाढले
शुक्रवारी एकाच दिवसांत ग्रामीण भागात तब्बल 726 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी आढळून आलेल्या रूग्णामध्ये आटपाडी तालुक्यात 71, जत तालुक्यात 45, कडेगाव तालुक्यात 79 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 78, खानापूर तालुक्यात 60, मिरज तालुक्यात 74 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 85, शिराळा तालुक्यात 39, तासगाव तालुक्यात 68 आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 127 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 36 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 36 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 32, 39, 48, 65, 70, 71 आणि 87 वर्षीय व्यक्तांचा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज शहरात चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 50, 60 वर्षीय व्यक्तीचा आणि 62 आणि 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बामणोली येथील दोघांचा मृत्यू झाला. 54 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय व्यक्ती यांचा मृत्यू झाला. मांजर्डे येथील 61 वर्षीय व्यक्ती, चिंचणी येथील 56 वर्षीय व्यक्ती, आटपाडी येथील 53 वर्षीय व्यक्ती, बुधगाव येथील 55 वर्षीय व्यक्ती, बाज येथील 65 वर्षीय महिला, डोंगरसोनी येथील 70 वर्षीय महिला आणि वायफळे येथील 58 वर्षीय व्यक्ती यांचा मिरजेतील कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. पाडळी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वैजापूर येथील 70 वर्षीय महिला, दिघंजी येथील 50 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. आष्टा येथील 70 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. बनाळी येथील 90 वर्षीय व्यक्तीचा, पलूस येथील 60 वर्षीय व्यक्तीचा रेठेरेधरण येथील 44 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला.
कसबे डिग्रज येथील 86 वर्षीय व्यक्तीचा ऍपेक्स मिरज येथे, फार्णेवाडी येथील 60 वर्षीय महिलेचा आणि इस्लामपूर येथील 60 वर्षीय व्यक्तीचा आधार हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. सावळज येथील 33 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील येथे, वळसंग येथील 58 वर्षीय महिलेचा मयुरेश्वर हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. सावळज येथील 75 वर्षीय व्यक्तीचा तासगाव येथील रूग्णालयात, 49 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. नागराळे येथील 78 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 36 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 798 झाली आहे.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील आकिवाट येथील 72 वर्षीय महिलेचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे. जयसिंगपूर येथील 78 वर्षीय महिलेचा भगवान महावीर हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 133 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
राज्यमंत्री विश्वजीत कदम ही पॉझिटिव्ह
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःहून ही माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसेच ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. यापुर्वी त्यांचे काका आमदार मोहनराव कदम, दोघे चुलत भाऊ, भावजय आणि पुतण्या हेही कोरोनाबाधित झाले होते. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विश्वजीत कदम यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनाही स्वतःला अलगीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
एका दिवसांत विक्रमी 875 जणांची कोरोनावर मात
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही आता चांगलीच वाढत चालली आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत विक्रमी 875 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील 11 हजार 622 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 21370
बरे झालेले 11622
उपचारात 8950
मयत 798