कारवाई करण्याबाबत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
दिघंची/वार्ताहर
दिघंची येथील सुभाष नामदेव मोरे व विकास नामदेव मोरे या दोघा भावंडांनी ओढापात्रात अतिक्रमण केल्याची तक्रार लगतचे शेतकरी बाळासाहेब नळ यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.या अतिक्रमण मुळे ओढा पात्रातील पाणी शेतात घुसून प्रचंड नुकसान झाले असून ती नुकसान भरपाई सदर विहिर मालकांकडून मिळावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा बाळासाहेब नळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की जगन्नाथ यशवंत नळ यांचे नावे असलेली गट नं५९३ ही शेतजमीन त्यांचा मुलगा बाळासाहेब नळ हे कसतात. त्यांच्या जमिनीलगत ओढापात्र असून त्यामध्ये शेजारी असणाऱ्या सुभाष नामदेव मोरे व विकास नामदेव मोरे यांनी ओढ्याच्या मध्य भागी विहीर पाडली आहे.तसेच त्या विहिरिचे निघालेले दगड व माती ओढापात्रात आडवे टाकले आहेत त्यामुळे पात्र सत्तर टक्के अडवले गेले आहे.त्यामळे ओढ्याला आलेले पाणी माझ्या शेतात घुसून पिकासह मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे. शेकडो ब्रास माती व दोन विहिर व आड मुजून गेले आहेत.तसेच द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अतिक्रमण केलेल्या विहिरीमुळे ओढ्याचे पात्र बदलले आहे.तसेच सदरची विहीर विनापरवाना पाडली असल्याचा दावा बाळासाहेब नळ यांनी केला आहे.
सदरचे झालेले नूकसान भरून निघने शक्य नाही. सदरचे झालेले नूकसान भरपाई अतिक्रमण केलेल्या केलेल्या व्यक्ती कडून भरून मिळावी व मला न्याय द्यावा अशी मागणी नळ यांनी केली आहे तसेच न्याय न मिळाल्यास कुटुंबियांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा बाळासाहेब नळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.