भोगवाट शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज न देण्याचा आदेश, शेकडो प्रस्ताव प्रलंबित, नेते गप्पच का?
प्रतिनिधी / नांद्रे
मिरज तालुक्यातील नांद्रे येथील भोगवाट वर्ग दोन या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास कोणतीच बँक तयार नाही. प्रामुख्याने यामध्ये जिल्हा बँकेचा देखिल समावेश असून इतर कोणतेही बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती व कुंटूब व्यवस्थेचे नियोजन करणे मुश्कील झाले आहे.
याबाबतचे शेकडो प्रस्ताव प्रलंबित आहेत. बँकानी हा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधी असूनही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे नेतेमंडळी याबाबत आजूनही गप्पच का? अशी संत्पत प्रतिक्रिया लोकांतून उमटत आहे.
महापूर, कोरोना आदी आसमानी संकटाने आधीच शेतकऱ्यांच्या जीवनात घाला घातला आहे. परिणामी शेतकरी उध्दवस्त झाला असताना त्यांच्या संकटकाळी त्यांच्यासोबत सर्व घटकांनी मदत करून त्यांना पुन्हा उभे करण्याची गरजेच असताना देखील बँका, नेतेमंडळी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.