वि. द. बर्वे यांची मागणी ; राज्यपालांना पत्र
प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या चारवेळा झालेल्या लेखापरीक्षांतून १५०० कोटी रुपयांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. परंतु शासन, प्रशासन पातळीवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालावे, शासनास कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरीक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यासंदर्भात बर्वे म्हणाले, महापालिकेतील गैरकारभाराबद्दल आम्ही वर्षानुवर्षे लढा देत राहिलो. चार विशेष लेखापरीक्षणे झाली. त्यात कमीत कमी १२०० ते १५०० रुपयांचे गैरकारभार चव्हाट्यावर आले. त्याप्रकरणी भार-अधिकारही लागला आहे. वास्तविक याप्रकरणी न्यायालयाने शासन, महापालिकेला कारवाई व वसुलीचे आदेश देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता राज्यपाल कोठारी यांनीच यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी बर्वे यांनी केली आहे.