प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी कायम असून येथील गणपती पेठ, दत्त मारुती रोड, कापड पेठ, स्टेशन रोड, बालाजी चौक, हरभट रोड आदी प्रमुख पेठांमध्ये रस्त्यावर वाहने कशीही उभी केली जातात. त्यातच दत्त मारुती रोडवर भाजी विक्रेते आणि फेरीवाले रस्त्याच्या मध्येच बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून गाडी फिरवल्यानंतर फेरीवाले तात्पुरते तिथून मागे सरकतात. आणि पुन्हा आहे. तीच परिस्थिती असे चित्र कायम आहे. गणपती पेठ मध्ये वाहतुकीच्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.