विक्रम चव्हाण / सांगली
अरुंद रस्ते, वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या अन् वाहतूक पोलिसांचे अपुऱया बळाचा बाऊ न करता मागील तीन वर्षात शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुन निकम यांना यश आले आहे. सिग्नल असो वा सीसीटीव्हीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील वाहतूकीला शिस्त लागली आहे. ई चलन प्रभावी अमंलबजावणी झाली. शहरात नो पार्किंगसह दिशादर्शक बोर्ड, डिव्हाडरसह लेफ्ट फ्री सिग्नल सुरु करण्यात निकम यांचा सिंहाचा वाटा आहे.
तीन वर्षापूर्वी शहरातील वाहतूकीचा अक्षरशः खेळखंडोबा झाला होता. अरुंद रस्त्यामुळे शहरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच झाली होती. राजवाडा चौक, सिव्हील हॉस्पिटल चौक, विश्रामबाग तसेच पुष्पराज चौकातील वाहतूक कोंडी अनेकांच्या जीवावर उठली. पार्किंगची सोय नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभा राहत असल्याने दिवसेंदिवस अपघात आणि वाहतूकीच्या कोंडीत भरच पडली होती. मात्र गेल्या तीन वर्षात हे चित्र बदलले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी शहरातील वाहतूकीला चांगलीच शिस्त लावली आहे.
सिग्नलसाठी यशस्वी पाठपुरावा
सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी 6 जानेवारी 2017 रोजी सांगली वाहतूक नियंत्रण शाखेचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हाण त्यांच्यासमोर होते. शहरात सिग्नलची वाणवा होती. जे सिग्नल होते, ते नादुरुस्त होते. त्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता होता. कार्यभार स्विकारताच निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्यासह महापालिका आयुक्तांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परिणामी वाहतूकीची कोंडी होत असलेल्या कॉलेज कॉर्नर तसेच पुष्पराज चौकात अद्यायावत सिग्नल उभा राहीले. विजयनगर चौकातील सिग्नल लवकरच कार्यन्वित होतो आहे. आझाद चौकातील सिग्नलही उत्तम पध्दतीने सुरु आहे.
सीसीटीव्ही, डिव्हाडरमुळे वाहनांना शिस्त
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापालिका, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह अनेकांच्या सहकार्याने शहरात सीसीटीव्ही पॅमेरे, नो पार्किंग बोर्ड तसेच डिव्हाडर बसविण्यात अतुन निकम यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात जवळपास 93 सीसीटीव्ही बसविण्यात आले. अजून 57 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली निकम यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नातून शहरात अनेक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड झळकले. प†िरणामी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहणाऱया वाहनांचा शिस्त लागली. राजवाडा चौक, विश्रामबाग चौकात डिव्हाडर बसविण्यात आले. पुष्पराज आणि विश्रामबाग चौकात ‘लेफ्ट फ्री सिग्नल’ सुरु करण्यात आले. परिणामी शहरातील वाहतूक सुरळीत झाली आहे.
ई चलनची प्रभावी अमंलबजावणी
राज्यात ई चलन कार्यप्रणाली सुरु करण्यात आली. याची अमंलबजावणी करणे करणे तसे आव्हानात्मक काम होते. निकम यांनी वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या असतानाही त्याचा बाऊ न करता शहरात ई चनलची प्रभावी अंमलबजावणी केली. वाहनचालकांच्या विरोधात प्रसंगी कडक कारवाईचा बडगा उगारला. इ चलनच्या कारवाईमुळे मोठय़ा प्रमाणात दंड वसूल झालाच मात्र वाहनचालकांच्या मनमानीलाही चांगलाच चाप लागला. दंड वसूल करताना वाहतूक पोलिस व वाहनचालकांच्यामध्ये होत असलेल्या वादालाही ई चलनमुळे पूर्णविराम मिळाला. यासह काही बेशिस्त वाहतूक पोलिस कर्मचाऱयांनाही निकम यांच्यामुळे शिस्त लागली. कर्मचाऱयांचे मनोबल वाढविण्यासाठीही त्यांनी गेल्या तीन वर्षात चांगले काम केले.
अपघातांचे प्रमाण घटले
वाहतूकीची केंडी व बेशिस्त वाहनचालकांच्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले होते. गेल्या तीन वर्षात यामध्ये तब्बल 15 टक्क्यांनी घट आली आहे. वाहतूकीची फुटलेली कोंडी हेच यामागचे मुख्य कारण आहे. याचे सारे श्रेय सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱयांचा मोलाचा वाटा आहे. वाहतूक पोलिसांनी चौकाचौकातील ‘व्हिजीबिलीटी’ वाढल्यामुळे अनेक गंभीर गुह्यांना आळा बसला आहे.
कामगिरीबाबत समाधानी
गेल्या तीन वर्षात शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्यासह मनपा आयुक्त, पदाधिकारी यांच्यासह नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभले. लेफ्ट फ्री सिग्नल, सीसीटीव्ही, सिग्नल, नो पार्किंग तसेच दिशा दर्शक बोर्ड लावल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फुटली. अपघातांचे प्रमाण घटले. याबाबत समाधानी आहे.
अतुल निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक
वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली