ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
साखर कारखान्यांना सीनएजी बायोगॅससारखे प्रकल्प सुरू करण्यास केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी दोन वर्षात 2 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे.
देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज, डिस्टिलरी या उपपदार्थांबरोबरच सीएनजी बायोगॅससारखे प्रकल्प उभारावेत, यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
सीएनजी बायोगॅस 46 रुपये प्रती किलो दराने खरेदी करण्याची तयारीही केंद्र सरकारने दर्शवली आहे.त्यामुळे देशातील 5 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार आहे.