●बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाचे पत्र
●शिक्षकांच्यामध्ये आनंदाच्या उकळ्या
●आंतरजिल्हा बदली इच्छुक झाले नाराज
सातारा / प्रतिनिधी
शिक्षकांच्या बदल्या म्हटल्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नेत्यांसह अधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची तारांबळ सुरू असते.यावर्षी कोरोनामुळे बदल्या मे महिन्यात घेतल्या नाहीत.मात्र जुलै महिन्यात पत्र आले होते.परंतु कोरोनामुळे या बदल्याना विरोध होत होता.शिक्षक संघटनाकडून नेत्यांना मंत्री यांना भेटुन मागणी सुरू होती.बुधवारी दुपारी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून केवळ विनंती जिल्हाअंतर्गत बदल्या घेण्याचे पत्र आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.प्रशासकीय बदल्याना तूर्तास स्थगिती दिल्याने हा आनंद आहे.
शिक्षकांच्या बदल्या म्हटल्यावर बऱ्याच घडामोडी सुरू असतात. आपल्या गावाजवळची सोयीची शाळा शिक्षक मागतात.मात्र, बदल्याची प्रत्येक वेळी धोरण बदलत राहिली आहे. पूर्वी नेत्यांना बदल्यावेळी मोठी विनंती करावी लागायची.स्थानिक पातळीवरील नेते जवळच्या शिक्षकांच्या बदलीसाठी धडपडत होते.आता ही ऑनलाईन बदलीसाठी स्वतः शिक्षकच खटपटी करत असतात. 27 फेब्रुवारी 2017 च्या आदेशानुसार बदली प्रक्रियेवर शिक्षक संघटना नाराज होत्या. या सरकारने पहिल्याच बदल्यांच्या वर्षात कोरोनाचे संकट आले.त्यामुळे प्रक्रिया लांबली गेली. आता बुधवारी आलेल्या पत्रात म्हटले आहे की, 2020-21या वर्षात प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंर्तगत आणि आंतरजिल्हा बदल्या करण्याबाबत कळवले होते.जिल्हाअंर्तगत बदल्याची कार्यवाही करताना जिल्हा परिषद स्तरावर काही मुद्दे पुढे आले.दि.15 जुलैच्या पत्रानुसार बदल्यांची प्रक्रिया करताना गर्दी होण्याची शक्यता आहे.त्याच अनुषंगाने शासनाचे असे आदेश आहेत की कोरोनामुळे सोशल डिस्टनन्सच्या दृष्टीने शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी कोणाची तक्रार येणार नाही.याची खबरदारी घेऊन सामाजिक अंतर ठेवून शासनाचे नियम पाळून शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या समुपदेशनाने कराव्यात, प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नये, विनंती बदल्या करताना शिक्षकांच्या रिक्त पदाच्या समानीकरणासंदर्भात शासनाचे आदेश पाळावेत असे नमूद केले आहे.त्यामुळे काही शिक्षकांना आनंद झाला आहे.आलेले संकट टळले अशी चर्चा सुरू आहे.
नंतर विनंती बदल्या कराव्यात
तालुकाच्या बाहेर गैरसोईत गेलेल्या शिक्षकांना विनंती ने तालुक्यात येण्याची संधी द्यावी. आंतरजिल्हा बदल्या करून उपलब्ध होणाऱ्या. तसेच मूळच्या रिक्त जागा तसेच समानीकरणाच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. नंतरच विनंती बदल्या कराव्यात, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष(थोरात गट)चंद्रकांत यादव यांनी दिली.
फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या
बदल्यांचे समुपदेशन करताना सोशल डिस्टनशींग पाळणे अवघड आहे. म्हणून शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या आज नवीन पत्र काढून पुर्णपणे रद्द केले आहे. फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या विहीत मुदतीत करण्याची सुचना दिली आहे.शिक्षक संघाने या पत्रानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे विनंती बदल्या कराव्यात अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, सरचिटणीस प्रदीप घाडगे, सुगंधराव जगदाळे, संजय शेजवळ, विकास देशमुख, संतोष कदम, बाजीराव शेटे, नानासाहेब शेडगे, पृथ्वीराज गायकवाड, प्रदीप रवलेकर, आनंदा चाळके, तुकाराम शेलार, राकेश ओतारी, सुरज तुपे, नवनाथ क्षीरसागर, अजय गुजर आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.