ऑनलाईन टीम / पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत तेलावर आधारित इंधनाकडून गॅसवर आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे तसेच नैसर्गिक वायूंचा वापर सहा टक्क्यांवरून १५ टक्क्ंयापर्यंत वाढविण्याचे निर्धारित केले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीला प्रत्यक्ष आणण्याचे आणि पुढे नेण्याचे कार्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान करत आहेत. त्यासाठी दिवसेंदिवस शहरातील गॅस वितरण यंत्रणा सक्षम करतानाच ४०२ जिल्ह्यांमध्ये २७ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत ७० टक्के लोकसंख्येला आणि देशाच्या ५३ टक्के भौगोलिक क्षेत्रात याचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहर हे नेहमीच पुढे राहिले आहे, विशेषत: पर्यावरणाच्या बाबतीत हे शहर संवेदनशील आहे. ऑटोमोबाईल, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करून एमएनजीएलने पर्यावरणची गुणवत्ता वाढविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे, असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या १६ स्थापनादिनानिमित्त मागील १५ वर्षांतील एमएनजीएलच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी बापट बोलत होते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हल्दर, स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, माणिक कदम, सुजीत रुईकर, अविनाश त्रिपाठी, मयुरेश गानू, सागर वर्मा, अमोल हट्टी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, विकासाचा हा प्रवास पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन, पीएमसी व पीसीएमसीचे आयुक्त, पोलिस व अन्य अधिकाºयांशी चर्चा केली. परिणामस्वरूप एकूण ९५ टक्के परवानग्यांना पुन्हा कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही कामांना परवानगी मिळाली आहे तर पीएमसी व पीसीएमसीमधील काही कामांना लवकरच परवानगी मिळू शकणार आहे.