ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतातरी मान्य करतील का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे, हे मोदी आता तरी मान्य करतील का? आणि देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतील का? ”असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.