वार्ताहर /हिंडलगा
हंगरगे आणि मंडोळी गावांना सुरळीत बस सोडण्याच्या मागणीसाठी बुधवार दि. 1 रोजी मंडोळी ग्रा. पं. वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढुन अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
परिवहन महामंडळाच्या अधिकाऱयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंडोळी आणि हंररगे गावांना यापूर्वी तीन बसेस सोडल्या जात होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत
आहेत.
शिवाय केवळ दोन बसेस सध्या गावात येत जात आहेत. त्या ठराविक वेळेवर येत नसल्याने बस पास काढलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे दोन्ही गावच्या प्रवाशांतून परिवहन मंडळाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत
आहे.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, उपाध्यक्षा सुवर्णा होसकोटी, पीडीओ ज्योती मेट्टी, सदस्य यल्लाप्पा पाटील, नारायण शिंदे, निवृत्ती तळवार, अश्विनी तळवार, लक्ष्मी सुतार यांच्यासह ग्रामस्थ, प्रवासी व विद्यार्थी उपस्थित होते.