वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
मी बँकेतून बँक मॅनेजर बोलतो तुमचे ए. टी. एम. कार्ड बंद पडले आहे. तुमचा ए. टी. एम. नंबर सांगा, तुमच्या मोबाईल कार्डला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. प्रथम तुम्ही तुमच्या खात्यावर 100 रुपये भरा आम्ही लगेच 10 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करतो, असे सांगून सावज त्यांच्या गळाला लागले तर त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेण्याचे प्रकार शहरी व ग्रामीण भागात सुरूच आहेत.
सायन्स व टेक्निकल एवढे पुढे गेले आहे. परंतु तितक्मयाच डोक्मयाने लुबाडणारे भामटेही तयार झालेले आहेतच. परंतु याला आपणच जबाबदार ठरतो. अमिषापोटी भामटय़ांनी विचारलेली आपल्या खात्याची माहिती देतो नंतर लुबाडल्यावर आपण फसलो म्हणून गोंधळ घालतो.
कंग्राळी बुद्रुक येथील एका ए. टी. एम. धारकालाही मंगळवारी असाच अनुभव आला. परंतु ए. टी. एम. धारकांने बाळगलेल्या सावधानतेमुळे त्या भामटय़ाचे प्रयत्न निष्फळ ठरली.
मंगळवार दि. 10 रोजी सकाळी मी बँक मॅनेजर बोलतोय तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. तुमचा नंबर सांगा म्हणून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. प्रथम त्या कार्डधारकाने विचार केला. आपला नंबर कोणालाही माहीत नसतो व बँकेमधील कर्मचारी कधी असे कळवत नाहीत जर बंद पडलेच तर आपण स्वतः बँकेमध्ये जाऊन चौकशी करायचे असते, असे असताना खुद्द बँक मॅनेजर कसे काय फोन करेल हा कुणीतरी लुबाडणारा भामटाच असणार म्हणून अरे माझ्या ए. टी. एम. कार्डाची माहिती तुला कशाला रे पाहिजे गप्प गुमाण फोन ठेवतोस की, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्या या फोनची चौकशी करून तुझी धुलाईच करतो, असे म्हटल्याबरोबर भामटय़ाने फोन बंद करून परत फोन केला नाही. परंतु ए. टी. एम. धारकांच्या सावधानतेमुळेच त्याचे पैसे सुरक्षित राहिले.
आता स्वतःच शहाणे होणे गरजेचे
भामटय़ांनी अशा प्रकारे आपली फसवणूक केली असून खात्यावरील रक्कम गायब झाली. सोने पॉलिसच्या बहाण्याने सोने लुटले अशा बातम्या दररोज वृत्तपत्रातून येतात. नागरिक वाचतात परंतु वरील प्रमाणे फोन आल्यास माणसांच्या मनात लोभ तयार होतो ती कुणालाही सांगत नाही परस्पर आपला व्यवहार करतो मग फसवणूक झाल्यावर आपण लुटलो गेलो म्हणून गोंधळ घालतो तेव्हा आशा अमिषाला बळी न पडता, असे फोन आले तर त्यांना चांगलेच खडसावणे परत तो तुम्हाला फोन करणार नाही व तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतील.
तेव्हा अशा भामटय़ांना आपल्या बँक खात्यातील किंवा एटीएम खात्याची कोणतीही माहिती न सांगता बँक कायम अशा निनावी फोनधारकांना आपल्या खात्यावरील आर्थिक रकमेची कुणी ही माहिती सांगू नका, असे मेसेज पाठवत असतेच. याचे अनुकरण करणे जर बँक खातेदाराने व्यवहार केल्यास कधीच कुणाची फसवणूक होणार नाही हे ध्यानात ठेवावे.
कार्डधारकाच्या सावधगिरीमुळे पैसे सुरक्षित
‘ हॅलो, मी बँकेतून बँक मॅनेजर बोलतो तुमचे ए. टी. एम. कार्ड बंद पडले आहे. तुमचा ए. टी. एम. नंबर सांगा, तुमच्या मोबाईल कार्डला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. प्रथम तुम्ही तुमच्या खात्यावर 100 रुपये भरा आम्ही लगेच 10 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करतो’, असे सांगून सावज त्यांच्या गळाला लागले तर त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेण्याचे प्रकार शहरी व ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात सुरूच आहेत.
कंग्राळी बुद्रुक येथील एका एटीएमधारकालाही मंगळवारी असाच अनुभव आला. परंतु त्याने बाळगलेल्या सावधानतेमुळे त्या भामटय़ाचे प्रयत्न निष्फळ ठरले.
मंगळवार दि. 10 रोजी सकाळी बँक मॅनेजरचा फोन आल्याबरोबर प्रथम त्या कार्डधारकाने विचार केला. आपला नंबर कोणालाही माहीत नसतो व बँकेमधील कर्मचारी कधी कार्ड बंद पडल्याचे कळवत नाहीत. आपण स्वतः बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची असते, असे असताना खुद्द बँक मॅनेजर कसा काय फोन करेल हा कुणीतरी लुबाडणारा भामटाच असणार असा विचार करून ‘पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्या या फोनची चौकशी करून तुझी धुलाईच करतो,’ असे सांगितले. भामटय़ाने लागलीच फोन बंद केला. आणि ए. टी. एम. धारकांच्या सावधानतेमुळेच पैसेही सुरक्षित राहिले.